Posts

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब

*राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या!* ---------------------------- ---------------------------- राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले, पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही, संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत, याउलट संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावरती त्यांनी यशस्वी मात केली. राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकियांची चाकरी करण्यापेक्षा भूमि...

कोण होत्या सावित्रीमाई

सावित्रीमाई कोण होत्या? ================ सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो. • सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे. • त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती. • त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते. • त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रे...

पंजाबराव देशमुख

 *डॉ.पंजाबराव देशमुख : कर्तृत्ववान, विद्वान लोकनेता !* ------------  ज्यांनी लंडनमध्ये जाऊन प्राच्यविद्येत पीएच.डी. मिळवली. तेथेच बॅरिस्टर झाले व मायभूमीत येऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात धोरणात्मक कार्य केले. अशा जागतिक कीर्तीच्या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याबाबत बहुतांश महाराष्ट्रीयन मात्र अनभिज्ञ असावेत, ही बाब अत्यंत दुःखदायक आहे.                                       डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी कदम देशमुख या घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामरावबापू तर आईचे नाव राधामाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजे पापळ येथे तर माध्यमिक शिक्षण कारंजा लाड आणि अमरावती येथे झाले. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. बालपणापासून शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचंड पगडा त्यांच्या मनावर होता. त्यामुळे अध्ययनाची चिकाटी त्यांनी सोडली नाही. त्यांचे...

घटस्थापना

 *घटस्थापना-नवरात्रोत्सव शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान                               निसर्गातील कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झाला नाही, तर तो प्रत्येक टप्प्यावर उत्क्रांत होत आलेला आहे, ती एक रासायनिक प्रक्रिया आहे, असे जगविख्यात मानवशास्त्रज्ञ (Anthropologist) डार्विन यांचे मत आहे. मानव हा देखील निसर्गातील एक प्राणीच आहे. तो देखील उत्क्रांत होत आलेला आहे. एका विशिष्ट टप्प्यावर तो मानवासारखा दिसायला लागला. सुरुवातीच्या अवस्थेला एस्ट्रोलोपिथिकस असे मानवशास्त्रज्ञांनी त्याला नाव दिले. तिथपासून आजपर्यंत सुमारे 40 ते 25 लाख वर्षांचा प्रवास आहे, असे मानले जाते. सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी बोधात्मक क्रांती (cognitive revolution) झाल्यानंतर त्याचा विकासाचा वेग झपाट्याने वाढला.                             भटक्या अवस्थेतला माणूस स्थिर कसा झाला, तर त्याला शेती हेच महत्त्वाचे कारण आहे. पेरलेले उगवते हे प्रथमता स्त्रीच्या लक्षात आले, हा क...

देशभक्त भगतसिंग

 *बुद्धिप्रामाण्यवादी क्रांतीकारक देशभक्त भगतसिंग !* --------------------------- -डॉ.आशिष रजपूत ---------------------------                                 वयाच्या विशीतच ज्यांच्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील परिपक्वता आलेली होती, असे महान देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी आताच्या पाकिस्तानातील व पूर्वीच्या अखंड भारतातील पंजाब प्रांतातील बंगा, जिल्हा लालपुर येथे एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंग तर आईचे नाव विद्यावती होते. संपूर्ण परिवार हा स्वातंत्र्यविचाराने भारावलेला होता. आजोबा,वडील, चुलते अजितसिंग हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गदर पार्टीमध्ये ते सक्रिय होते. भगतसिंगाचे जन्म नाव भाग्यवंत असे होते. त्यांच्या आजीने भाग्यवंत असे नाव ठेवले होते. भाग्यवंत याच नावाचा अपभ्रंश पुढे भगतसिंग असा झाला.                         ...

शाक्त राज्याभिषेक

 *शाक्त शिवराज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन!*                              शिवाजीराजांच्या जीवनातील क्रातीकारक घटना म्हणजे शाक्त राज्याभिषेक! शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी करून सनातनी परंपरा नाकारली. पहिल्या राज्याभिषेक प्रसंगी सनातनी धर्माने त्यांना शूद्र ठरवून छळले, हे महान संस्कृत पंडित छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजीराजांच्या निदर्शनास आणून दिले व संभाजीराजांच्या सल्ल्यानुसार शिवरायांनी शाक्त राज्याभिषेक केला, असे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात.                             शिवाजीराजे प्रवाहपतीत नव्हते. उठले आणि कोणाचे तरी ऐकून शाक्त राज्याभिषेक केला, असे घडले नाही. ते विचारी होते. ते विवेकी होते. ते प्रगल्भ होते. ते जसे लढवय्ये होते तसेच ते तत्वज्ञानी होते. पहिला वैदिक राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी दुसरा शाक्त राज्याभिषेक केला, याला कांहीतरी निश्चितच कारण असेल.  ते दूरदृष्टीचे राजे होते. ते...

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे

 *साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे :    ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.                                            त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात, गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही.                                               प्राच्यविद्यापं...